Posts

Showing posts from April 1, 2020

रोगराई टाळण्यासाठी बेटमोगरा ग्राम पंचायत च्या वतीने गावभर केली जांतूनाशेक फवारणी.

Image
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे  तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालय च्या माध्यमातून गावचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, ग्रामसेवक श्री.स्वामी व ग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांच्या मार्फत गावातील रोगराई टाळण्यासाठी तिन पावर स्प्रेव्दारे औषधीची फवारणी सोमवार (ता.३०) रोजी केली असल्याचे सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील यांनी माहिती दिली आहे.   मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तसेच रोगराई टाळण्यासाठी गाव स्वच्छ ठेवा रोगराई पळवा हे ब्रिद वाक्य घेऊन बेटमोगरा येथे ग्राम पंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून गावात रोगराईला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी गावचे सरपंच सौ पद्मजा खुशालराव पाटील यांनी पुढाकार घेत पावर स्प्रे पंपा व्दारे सोडियम हायपोक्लाराईडची (पावडर) फवारणी केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय यांच्या या उपक्रमाचे बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. चिनू पाटील,शिवाजी माधवराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबाई सोनकांबळे,कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत...

बेटमोगरा येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जन्मोत्सव निमित्त अभिवादन.

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे   मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मशील बुद्धविहार येथे अशोका जन्मोत्सव २०२० राष्ट्रीय पर्व अशोकाष्टमी चैत्र शुक्ल अष्टमी १ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजता प्रियदर्शी  राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला रमाई  फाऊंडेशन चे सचिव भारत सोनकांबळे व ग्रा.पं. सदस्या लालीताबई सोनकांबळे,याच्या हस्ते दीप्रज्वलन करुन,पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भारत सोनकांबळे यांनी राजा सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देत ते म्हणाले, केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी,न्यायाच्या, प्रेमाच्या,विश्वासाच्या जोरावर जग जिंकले. काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ,चीन,मंगोलिया इराण,इजिप्त,श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो म्हण...