Posts

Showing posts from December, 2019

घरकुल लाभार्थाना रेती उपलब्ध करा - वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे  काम केवळ रेती अभावी अडले आहे . रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नाही . आता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास  योजनेअंतर्गत तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला. तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते. परिणामी तालुक्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते.   तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने  पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु शासकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे घरकुल लाभार्थाना रेतीचा कण ही मिळालेला नाही शासकीय योजने अंतर्गत विहीत मुदतीत बांधकाम पुर्ण करण्याचा दंडक आसल्याने घरकुलाचे बांधकाम र...

गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे

Image
गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे मंडळधिकारीचा सैराट कारभार स्मशानभुमी जागेचा पाहाणी व पंचनामा अहवाल देण्यास मंडळधिकारी मुळेकर चा  टाळाटाळ बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव पुनरवसन झालेला गाव आसुन या गावातील नागरिकांना स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्याच्या  शेतावरील बांधाच्या कडेला अंत्यविधी अडपुन घ्यावा लागतो पावसाळ्याच्या दिवसात प्रेत नेण्यासाठी खुप अडचणी उदभावतात   जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणारच… पण, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळणे व या मुद्दय़ावरून संघर्ष होणे ही मनाला वेदना देणारी गोष्ट. आहे  गंजगाव या  ठिकाणी आजही अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध होत नाही. परिणामी मयत व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आज ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही संकल्पना साकारण्याची गरज असताना, सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागते..   महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात स्मशानभूमीचा विषय हा प्रमुख बनला आहे. ...