Posts

Showing posts from 2020

हाडाच्या कारखान्यामुळे परिसरात दुर्गधी बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर  दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा  कारखाना आहे  कोंडलापुर नाग्यापुर  सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात  शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे   अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण  मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे

मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली

 बिलोली  प्रतिनिधी   ( वैभव घाटे ) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे वयाच्या 104 वर्ष 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले आज दिं 14 सप्टेंबर 2020 रोजी मारोती मंदीर परिसरा सामोर सर्व गावकर्याच्या वतीन शोकसभा आयोजीत करुन श्रध्दांजली वाहीण्यात आली या प्रसंगी शिवभक्त भिमराव पाटील बावलगावकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता  किर्तनकार भिमराव पाटील रामराव पाटील माणिकराव पाटील यांच्या हास्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करुन आदरांणजली वाहीण्यात आली यावेळी रामराव पाटील माणिकराव पाटील हाणमंतराव पाटील मारोती पाटील गोविद पाटील शिवराज पाटील विश्वनाथ महाराज शिवकुमार मोठे नागनाथ पाटील बसवंत पाटील इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती अन्नदान करुन सर्व गावकरी मंडळी च्या वतिन महाराज श्रध्दांजली वाहीण्यात आली शासनाने दिलेल्या सुचनेचा काटेकोर पणे पालन करुन शोकसभा संपन्न झाली

फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली थाबवण्याची इंद्रजीत डुमणे गागलेगावकर याची मागणी नांदेड प्रतिनिधी -

Image
 कोरोना व्हायरसने जगात धुमाकुळ घातलेला आहे दिवसें दिवस रुग्नाची संख्या वाढत चालली आसताना  .तसेच मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 17 मे पर्यंत  लाॅकडाउन घोषीत केलेला आहे . संचार बंदी लागु असतानां सुध्दा मायक्रो फायनांन्स कंपनीचे कर्मचारी गावो गावी फीरत आहेत  लोकांच्या हाताला कामे नाहीत कसेतरी आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा परिस्थितीत लोक कसे मायक्रो फायनांन्सचे  पैसे भरतील विनाकारण लोकांना ञास देण्याचा प्रयत्न या कंपनीकडुन केल्या जात आहे.तेव्हा प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवुन लाॅकडाऊनच्या काळात या मायक्रो फायनांन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना गावो गावी फीरु देवु नये   फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची  वसुली पुढील पुढील तिन महीणे थांबवण्यात यावी अशी,मागाणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित डुमने यांनी केली आहे .

बिलोली येथील रक्तदान शिबिरात 66 जणांनी केले रक्तदान

Image
 बिलोली प्रतिनिधी  (वैभव घाटे)  शहरातीलच पंचायत समिती येथे  यूद्ध कोरोणाशी ग्रुप बिलोली व तालूका प्रशासन यांच्या  संयूक्त विद्यमानाने जीवन आधार रक्तपेढी नांदेड मार्फत रक्तदान शिबिर दि 4 एप्रिल रोजी संपन्न झाले असून 66 रक्तदात्यानी रक्तादान केले. भारतात कोरोना विषाणू ने भारतात घातलेला थैमान लक्षात घेऊन भारत सरकारने केलेल्या आव्हानाला स्विकारुन कोरोना ग्रस्थांना रक्ताचा पुरवटा करण्यासाठी युद्ध कोरोनाशी ग्रुप व बिलोली तालूका प्रशासन कडून अव्हान करण्यात आले होते.  शिबिरात शहर व तालूक्यातील गणेश मंडळाचे सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी ,सह महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणचे सगरोळी येथील मारोती पा.कुरुडगे यांच्या  कुटुंबातील 12 सदस्य व  श्रुती एच पि गँसचे कर्मचारी सह अनेकजन सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी बिलोली प्रशासनाचे तहसिलदार विक्रम राजपुत व नायब तहसिलदार ओम प्रकाश गोंड ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नायक ,यूद्ध कोरोनाचे प्रमुख इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदि...

धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,

Image
हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित  दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी  उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे  गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म...

युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने  ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप . कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे नायगाव तालुक्यातील देगाव येथील गोर गरीब शेतमजूरी करणार्‍यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले असून अशरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत  त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टी युवा नेते राहुल दादा गायकवाड यांच्या वतीने तालुक्यातील मौजे देगाव येथील गरजूंना  अन्न धान्याची  मदत करण्यात आली.या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष,मंगेश गायकवाड, सचिन, राजू    सर्व मित्र परिवार व कार्यकरते उपस्थित होते...

जिल्ह्यात उज्वला योजनेतील २ लाख लाभार्थ्यांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर

Image
लॉकडाऊन काळात उज्वला योजनेंतर्गत जोडण्या घेतलेल्या लाभार्थ्यांना दिलासा - नितीन आमले नांदेड प्रतिनिधी/ वैभव घाटे कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान उज्वला योजनेंतर्गत गॅस घेतलेल्या ग्राहकांना भारत सरकारने माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत गॅस रिफिल देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दोन लाख उज्वला योजनेंतर्गत जोडणी घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना मोफत गॅस पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नांदेड जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियमचे नांदेड जिल्हा सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली आहे.देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा गॅस मोफत मिळा...

रोगराई टाळण्यासाठी बेटमोगरा ग्राम पंचायत च्या वतीने गावभर केली जांतूनाशेक फवारणी.

Image
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे  तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालय च्या माध्यमातून गावचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, ग्रामसेवक श्री.स्वामी व ग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांच्या मार्फत गावातील रोगराई टाळण्यासाठी तिन पावर स्प्रेव्दारे औषधीची फवारणी सोमवार (ता.३०) रोजी केली असल्याचे सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील यांनी माहिती दिली आहे.   मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तसेच रोगराई टाळण्यासाठी गाव स्वच्छ ठेवा रोगराई पळवा हे ब्रिद वाक्य घेऊन बेटमोगरा येथे ग्राम पंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून गावात रोगराईला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी गावचे सरपंच सौ पद्मजा खुशालराव पाटील यांनी पुढाकार घेत पावर स्प्रे पंपा व्दारे सोडियम हायपोक्लाराईडची (पावडर) फवारणी केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय यांच्या या उपक्रमाचे बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. चिनू पाटील,शिवाजी माधवराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबाई सोनकांबळे,कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत...

बेटमोगरा येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जन्मोत्सव निमित्त अभिवादन.

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे   मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मशील बुद्धविहार येथे अशोका जन्मोत्सव २०२० राष्ट्रीय पर्व अशोकाष्टमी चैत्र शुक्ल अष्टमी १ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजता प्रियदर्शी  राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला रमाई  फाऊंडेशन चे सचिव भारत सोनकांबळे व ग्रा.पं. सदस्या लालीताबई सोनकांबळे,याच्या हस्ते दीप्रज्वलन करुन,पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भारत सोनकांबळे यांनी राजा सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देत ते म्हणाले, केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी,न्यायाच्या, प्रेमाच्या,विश्वासाच्या जोरावर जग जिंकले. काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ,चीन,मंगोलिया इराण,इजिप्त,श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो म्हण...

बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.

Image
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले. ‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार स...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड :- वैभव घाटे

Image
 सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला घरी राहण्याबाबत जनजागृती करत आ...

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

Image
सामाजिक उपक्रमातून साजरे करावेत जन्मदिवस -       डॉ.राहुल कांबळे मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील होडगीड वाडी दारू तांडा सोनपेठ वाडी फतु तांडा येथील पशुपालकां साठी गोवर्धन गो सेवा केंद्र परिसरात भव्य पशुरोग निदान शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला डॉक्टर राहुल कांबळे येवतीकर यांच्या आपला जन्म दिवस त्यानिमित्त आयोजित करण्यात आले सकाळपासून गेचुड फवारणी जंतनाशक गर्भ तपासणी शंभर जनावरावर मोफत विलाज करण्यात आलेला आहे. तर धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील आरोग्य विभागाचे उपकेंद्र वर कार्यरीत असलेल्या डॉ.राहुल कांबळे यांच्या सौभाग्यवती आरोग्य सेविका सौ.सोनाली वाघमारे यांनी आपल्या उपकेंद्रावर गरोदर मातास पोष्टीक आहार देऊन आपल्या कार्यसम्राट समाज सुधारक पतीला सामाजिक उपक्रमातून  दिलेल्या शुभेच्छा. मुखेड तालुक्यातील डॉक्टर राहुल कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते पण त्यांच्या समाजातील  दि.15 /03/2020 रोजी परिवारातील सदस्य मुखेड न्यायालयाती वकील गोरोबा कांबळे यांचा अपघाती न...

*बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला* ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
तालुक्यातील बेटमोगरा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की,बेटमोगरा हे गाव मोठी बाजारपेठ असल्याने येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेत  शेतकऱ्यांसाठी पीक विमा व दुष्काळी मदतीसाठी परिसरातील पंधरा ते वीस गांवाच्या कारभार होत होता.परंतु ह्या बँकेत दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री चोरट्यांनी बँक फोडून तेथील तिजोरी उचलून व गावातीलच अॅटो क्रं.एम.एच.२६ ए.सी.४७०६ हा अॅटो चोरुन तिजोरी घेऊन गावातील मन्याड नदी काठी जावून लॉक तोडण्याचा प्रयत्न केला पण तिजोरी वजनदार असल्याने फुटली नाही, शेवटी चोरट्यांनी तिजोरी व अॅटो सोडून पसार झाले.हा प्रकार सकाळी गावातील नागरिकांना समजताच त्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापक, मुखेड व देगलूर पोलिस ठाण्यात कळवली असता पोलिस उपअधीक्षक देगलूर रमेश सरवदे व मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर येऊन सदरिल घटनेची चौकशी व पंचनामा केला असता चोरट्यांना तिजोरी फुटली नसल्यामुळे तिजोरीतील ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित असल्याचे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सां...

गंजगाव जि.प.प्रा.शाळेत दोन शिक्षकावर चालतो शाळेचा कारभार

Image
बिलोली  प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची अपुरी संख्या आसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गंजगाव गाव हे तिन हाजार लोकवस्तीचे गाव आसुन येथिल जिल्हा परिषद डिजीटल शाळा व सुंदर इमारत आसुन पहीले ते सातवी पर्यत वर्ग आहेत  येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यां पटसंख्या चांगल्या प्रकारे आसुन शिक्षक संख्या चार आहेत चार शिक्षका पैकी दोन शिक्षकाना तहसिल कार्यालया कडुन बि.एल.ओ चे काम देण्यात आले आहे बाकीचे दोन शिक्षक सातवी पर्यतचे वर्ग सांभाळत आहेत सदरील शाळा डिजीटल शाळा म्हणून घोषित केली आहे पण या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत तर ही शाळा कुठल्या कामाची अशी नाराजी पालक व गावकर्यातुन होत आहे सदरील बाबीकडे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन सदरील शाळेत शिक्षक संख्या उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे 

येसगी ते गंजगाव जिल्हा मार्ग 41 चे डांबरीकरण करण्याची बांधकाम मंञी अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली मागणी बिलोली (प्रतिनिधी)

बिलोली  (प्रतिनिधी) बिलोली तालुक्यातील मौजे येसगी ते गंजगाव ह्या 6 कि.मी रस्ताची अवस्था वाईट आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 72 वर्षाचा काळ लोटला असुन एकीकडे जग चंद्रावर जात आहे पण स्वातंत्र्य पासुन शासन आणि प्रशासन गंजगाव ग्रामस्थाना साध्या चिखलातुन वर काठण्यास तयार नाही येसगी ते गंजगाव रस्ता हा जिल्हा मार्ग 41 चा प्रमुख रस्ता आसुन ह्या रस्तावर वाहानाची नेहमीच वर्दळ आसते.कार्ला ते गंजगाव रस्तावर मध्यभागी भयानक नाला आहे नाल्यावर सतत पाणीसाठा जमा होत आसल्यामुळे पाऊसाळ्यच्या दिवसात पाऊस झाला तर चार ते पाच दिवस तालुक्याशी संपर्क होत नाही विधानसभा मतदानावर गंजगाव ग्रामस्थाचा बहिष्कार होता परंतु प्रशासनाच्या मद्यस्थितीने व अश्वासनाने बहिष्कार माघार घेण्यात आला विधानसभा मतदान होवुन तिन महिन्याचा कालावधी लोटला पण आजुन रस्ता व पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही मागिल 25-30 वर्षापासुन येथिल जनतेच्या समस्याचा शासनाकडुन निपटारा होवु शकला नाही गावातुन मुख्य रस्ताला जोडता येईल आसा कुठलाच रस्ता शासनाकडुन केला नाही दरवर्षी पाऊसाळ्यात कार्ला ते गंजगाव दरम्यान आसणार्या आणि अतिशय जिर्ण झालेल्या...

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
मुखेड प्रतिनिधी :-  भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले  त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप उफळून आल्याचे दिसून ...

मुखेड कार्यक्षेत्रात 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे सडक सुरक्षा - जीवन रक्षा 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 च्या अनुषंगाने रस्ते हे समाजाच्या रक्त वाहिन्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड च्या वतीने मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी पणे राबविण्यात आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अविनाश धोंडगे यांच्या मार्गद्शनाखाली व कार्यकारी अभियंता श्री सुधीर नाईक यांच्या सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रात रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम 2020 ही प्रभावीपणे राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रातील राज्य रस्ते व इतर मार्गावर प्रवाशांसाठी व वाहन चालकांसाठी विविध बोधपृद बॅनर, होरडिंग्ज, सूचना  फलक, माहिती पुस्तिका,वाहन चालकांची प्रतिज्ञा चे होरडिंग्ज इत्यादी लावण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड चे उप अभियंता श्री ओमप्रकाश बेंबरे, शाखा अभियंता श्री पांपटवार, नीलकंठवार,श्री.शेंबाळे, श्री.उत्तम कुलकर्णी, श्री रवि, सखाराम कागणे, हुसैन शाहजौर, गोविंद राठोड,

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.

मुखेड  प्रतिनिधी :-  (भारत सोनकांबळे) मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.14 जानेवारी 2020 रोजी येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात  विश्वशातींचे उद्गाते, आणि कासल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्व वंदनीय महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ला मिळावे म्हणून 14 जानेवारी 1994 मध्ये ज्या महान शहीद हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्यामध्ये प्रामुख्याने टेभूर्णी येथील शहीद पोचिराम कांबळे,जनार्दन मवाडे, नांदेड येथील गौतम वाघमारे, चंदर कांबळे या सह अनेक शूरवीर या नामांतर लढ्यात शहीद झाले त्या सर्व शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्य...