बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे
सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे
लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले.
‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय बालाजी पाटील यांनी अशा भुकेल्यांच्या भुकेची जान लक्षात घेऊन दि.२९ मार्च रोजी बेटमोगरा येथील गरीब कुटूंबातील नाथ गोसाई (भिक्षुक) यांना तांदूळ,गहू,गोडतेल पॉकेट असे जीवनावश्यक धान्यांचे वाटप केले.
गरजू भुकेल्यांची भुक भागविण्यासाठी मुक्तहस्ते नाथ गोसाई भिक्षुक यांना दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.या दानत्वातून माणूस पैशाने नाही,तर मनाने श्रीमंत आसायला पाहिजे हे निदर्शनास आले आहे.
यावेळी रामदास मुदळे,इमाम पिंजारी,विश्वनाथ शिंदे,उत्तम शिंदे,आदि सह महिला पुरुष उपस्थिती होते.

Comments
Post a Comment