Posts

Showing posts from 2021
Image
  बरबडा येथे जवाहरलाल नेहरू विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे ७ जानेवारी रोजी आयोजन....                     माधव पवार नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नायगाव व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७  जानेवारी २०२२ रोजी १८ ते २९ वर्ष वय गटातील मुले व मुलींसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा,कबड्डी,स्पर्धा,खो खो व १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व कळावे आणि त्यांचे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना  उत्तेजन मिळावे या मागचा उद्देश असून आजच्या पिढीला विद्यार्थी  खेळापासून लांब राहत असल्यामुळे सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना  शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व असल्याने खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात खेळ खेळल्...
Image
  बरबडा येथे नूतन वर्षाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी दिलीपराव धर्माधिकारी झंजावत दौरा करणार              माधव पवार   नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या नंतर नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भाजपा पक्षाचे दिलीपराव धर्माधिकारी यांच्यासह गावचे सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या उपस्थित आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येणाऱ्या काळातील निवडूणुकी संदर्भात एक जानेवारी २०२२ पासून भवानी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा परिषद गटात जेष्ठ नागरिकासह तरुण युवकाला सोबत घेऊन झंजावत दौरा करणार असल्याचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली आहे.तालुक्यातील मौजे बरबडा येथे कै.गोविंदराव  धर्माधिकारी यांनी बरबडा सर्कलचा मोठया प्रमाणात विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले व कै.दिगंबरराव धर्माधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी घेऊन भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी जिल...
Image
  प्रशासनाच्या दरबारात आंदळ दळतय कुत्र पिठ खातोय  नायगाव पंचायत समितीच्या शासकीय जिपला २७ वर्षची  जिप एक्सबार,जिल्हा परिषद अध्यक्षासह सिईओला वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा सभागृहात केले मागणी सौ सभापती प्रभावती कत्ते        माधव पवार   महाराष्ट्र शासनासह नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे "आंधळं दळतय " कुत्र पिठ खातोय " अशी गत निर्माण झाल्याचे सरळ सरळ दिसून येत असून गेल्या अनेक वर्षाखाली पंचायत सामीतीला शासकीय वाहन म्हणजे जिप देण्यात आली त्या वाहणाची मुदत ही संपून गाडी एक्सबार ? झाली असताना सुद्धा शासनाने नवीन वाहन देण्यासाठी चाल ढकल करत असल्यामुळे नायागांव पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना करून ही शासकीय नवीन जिप मिळत नसल्यामुळे प्रशासनाच्या दराबारी आंधळ्याची म्हण्याची वेळ येऊ लागली आहे ना यागांव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण ८९ गावे असल्यामुळे सदर गावाचा कारभार पाहण्यासाठी शासकीय वाहनाची आवश्यकता असताना प्रशासन नवीन वाहन देण्यास टाळाटाळ करत असून गेल्या एक ते दीड वर्षात ...
Image
  बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ; वीटभटी मालकासह १२ जणावर पोलीस कार्यवाही ? ११ ट्रॅक्टर ताब्यात       माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे एका विटभट्टी धारकांनी नायगाव तहसील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली गोदाकाठची अवैध मातीचे ढीगारे त्या ढीगाऱ्यच्या मातीची शिफ्टिंग करीत रात्रीला करत असताना बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले व त्यांच्या टीमने संयुक्त कारवाई केली असल्याने या धाडीत अवैध  मातीची शिपटिंग करत असलेल्या अकरा ट्रॅक्टर व एक जेसीबी कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून वीटभटी मालकासह एकूण १२ जनावर कार्यवाही ?  करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी एकूण आकारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान बरबडा येथे करण्यात आल्याची माहिती सपोनि महादेव पुरी यांनी दिली आहे  ...
Image
  देगलुर-बिलोली मतदार संघात आचानक झालेल्या आवकाळी पाउस व गारीपीठीने रबी व इतर पिंकाचे नुकसान झाल्यामुळे पंचानामे करुन शेतकर्‍याना हेक्टरी ४० हजार मदत करा. जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याची मागणी                           वैभव घाटे दि२९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७-८ दरम्यान देगलुर बिलोली मतदार वादळी वार्‍यासह मुसळधार पाउस व सोबतच गारपीठ झाले यात रंबी पिकासह भाजीपाले फळबाग याचे आतो नात नूकासन झाले आहे.आगोदर खरीप पिकावेळेस सतत मुसळधार पाउस पडुन शेतकर्‍याचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हावालदीन झाले आहेत तर यातच भर म्हणुन पुन्हा २१ डिसेबंर रोजी राञी आवकाळी पाउस व गारपीठामूळे शेतकर्‍याचे नूकसान झाले आहे या मुळे देगलुर-बिलोली मतदासंघाती नुकसान झालेल्या शेतकर्‍याच्या पिकाचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार मदत द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे जिल्हाधिकार्‍यानकडे केली आहे. तसेच माहीस्तव मुख्यंमञी,विभागीय आयुक्त,उपजिल्हाधिकारी यानाही कळवले आहे. तर प्रशासन त्वरीच पंचन...
Image
  दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामुळे भाजपा सरकारला शेतकऱ्यापुढे अखेर नमावे लागले  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसीकर यांचे घुंगराळ्याच्या कार्यक्रमात प्रतिपादन  माधव पवार नायगाव   तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे देशाचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्याच्या चर्चासत्राच्या शिबीरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसिकर म्हणाले की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनातील शेतकऱ्यांपुढे आखिर नमावे लागले असल्याचे मत घुंगराळ्यांच्या  कार्यक्रमात व्यक्त केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथे   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे  शेतकऱ्यासाठी भाजीपाला व फळ उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शेतकऱ्यासाठी चर्चासत्र...
Image
 *जन्मदिवस युवानेतृत्वाचा.....!  जनसामान्यांच्या न्यायहक्काचं युवानेतृत्व आमदार मा.जितेश भाऊ अंतापूरकर"      प्रा. डॉ. गोविंद पाटील.*    " तुम्ही झालात परिस्थितीवर स्वार,    आणि घडविलात नवा इतिहास,    तुम्ही झालात जनसामान्यांचे नेते,    अन् बनलात महाराष्ट्रातील लोकप्रिय युवानेते."                   या काव्यपंक्ती प्रमाणे ज्यांची ओळख समग्र महाराष्ट्रात निर्माण झाली असे आमुचे मार्गदर्शक व परमस्नेही, महाराष्ट्रातील नवतरुण लोकप्रिय युवानेते, तरूणांचे आधारस्तंभ, जनसामान्यांचे असामान्य नेते, शांत, संयमी, नम्र, सुशिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू, उच्चविद्याविभूषित असं तरूण नेतृत्व वा महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस तथा देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकमान्य लाडके आमदार *मा. जितेश भाऊ अंतापूरकर* यांचा आज जन्मदिवस........! 🎂             मा.जितेश भाऊ अंतापूरकर म्हणजे श्रीमती. शितलताई व दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापुरकर यांच्या उदरी *३० डिसेंबर* रोज...
Image
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्याक्षासह नायगाव तालुका अध्यक्षात ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता...?         माधव पवार  पक्षा पक्षातले राजकारण म्हटल्याच्या नंतर अतिशय टोकाला जाऊन राजकारण केल्या जाते परंतु एकाच पक्षातील राजकीय पुढारी एकमेकांशी संगणमत करून राहण्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ही नेते मंडळीत आता राजकारण झडू लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरीहरराव भोसीकर कर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्याक्ष भास्कराव भिलंवडे यांच्यात पक्षा अंतर्गत ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शकता असल्याचे चित्र ग्रामीण भागातुन दिसून येत असले तरी गेल्या दोन ते तीन वर्षाखाली पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणाऱ्या भिलंवडेना एका कार्यक्रमातुन नाव वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट नाराज असला तरी ते गटबाजी कुठे तरी थांबली पाहिजे असे कार्यकर्त्यातुन बोलल्या जात आहे  नायगाव मतदार संघातील काही दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल...
Image
 प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या हस्ते सगरोळी येथे शिवा संघटनेच्या शाखेची पुनररचना करून फलकाच अनावरन                 वैभव घाटे       नांदेड- जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील  सगरोळी या गावातील *शिवा संघटनेच्या शाखा पुनररचना करुन नव तरूणांना संधी देत* नुतन कार्यकारिणी ची निवड करून *शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या शुभहस्ते शाखांच अनावरन* मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले.  *"शिवा संपर्क अभियान"* अंतर्गत शिवा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यभर शिवा संघटनेच्या 3000/ शाखांची पुनररचना करण्याचे *आदरणीय प्रा.मनोहरराव धोंडे सर* यांनी जाहीर केल्यानंतर प्रत्येक गावागावात शिवा संघटनेच्या शाखा पुनरगठीत करत युवा वर्गाला प्राधान्य देत एक नवचैतन्य निर्माण होताना दिसते आहे. याच धर्तीवर *बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे शिवा संघटनेच्या फलकाच अनावरन अत्यंत जल्लोषात जय शिवा च्या गजरात मोठ्या उत्साहाने झाले.*      यावेळी *शिवा संघटनेचे जिल्हा...
Image
  घुंगराळा येथे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र शिबीराचे आयोजन                 माधव पवार   नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आल्याची माहिती सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी दिली असून या कार्यक्रमात भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र व शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यानी मोठया संख्येने या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे   तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या कृषिरत्न हायटेक नर...
Image
विधानसभेच्या अधिवेशनात आठ आमदारानी तारांकित प्रश्न मांडल्यामुळे कारवाईच्या भितीने व्यंकेज इंडिया कंपनी बंद  नागरिकाचे आरोग्य धोक्यात ठेवून ? चालवित होते कंपनी                माधव पवार नायागांव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्यंकेज इंडिया कंपनी कडून अनेक वर्षा पासून विषारी द्रव्य व घाण पाणी सोडण्यात येत असल्या बाबत विधानसभेच्या आधिवेनात तांराकीत प्रश्न आठ आमदारांनी उपस्थित केल्यामुळे यावर प्रधान सचिवांनी आरोग्य विभागाला खूलासा मागविला होता. त्यावर आरोग्य विभागाणे कृष्णूर परिसरातील जल जनय आजारामूळे कोणताही साथीचा उद्रेक झाला नसल्याचा अजब खूलासा दिल्याने खळबळ उडाली होती परंतु कंपनीवर कारवाई होईल या भीतीमुळे व्यंकेजच्या व्यवस्था पकाने कंपनीच गेल्या सात ते आठ दिवसा पासून बंद करून ठेवल्यामुळे काही तरी काळेबेरे उघड होण्याची शक्यता नाकरता येत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे         नायगाव तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत चालणारी ही व्यंकेज इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकाने कोरोना महामारीच्या काळात शासन...
Image
तळेगवच्या महिलेची बळेगावच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या ? बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसांसह मच्छीमाराची केवळ २५ मिनिटाची झुंज यशस्वी                 माधव पवार   नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव गोदावरी पात्रात उमरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेल्या एका चाळीस वर्षे विधवा महिलेने दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात आटोच्या द्वारे माझे कोणी तर मयत झाले असल्यामुळे मौतीस जात असल्याचे कारण सांगुन मयत विधवा महिला ही बळेगावच्या पुलावर उतरली व थंड दिमाकाचा विचार करण्या ऐवजी गरम दिमाकाचा विचार करून पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी सदरील विधवा महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसासह मच्छीमारांना केवळ पंचविस मिनिटाची झुंज यशस्वी करावी लागली असली तरी पुलावर बघ्याची गर्दी जमली असल्याचे दिसून आले आहे         तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळेगाव गोदावरीच्या प...
Image
  सगरोळी परिवर्तन पॕनलचे वतीने करण्यात आले धरणे आंदोलन                बिलोली - वैभव घाटे  सगरोळी ता. बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमन धारक ४०० नागरीकांचे नमुना ८ भोगवटदार अशी नोद आहे. अश्या लोंकाचे नमुना ८ ला मालकी नोंद करा असे २०१८ साली शासनाने जि.आर काढून अतिक्रमन नियमाकुल करा असे परिपञक काढले व तसेच जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि २२/६/२०२१ जा.क्र १६६०/२०२१ रोजी पञा द्वारे ग्राम पंचायतला आदेशीत ही केले की अश्या नमुना नं ८ ची माहीती आँनलाईन द्वारे अतिक्रमन धारकाची माहीती प्रशासनास कळवा, असे लेखी सन २०१९ व २०२० मधे आम्ही ग्राम पंचायत कार्यालय सगरोळी ला कळवलो पण आद्यावत अतिक्रमनाची माहीती ग्राम पंचायतीने आम्हाला कळवले नाही. पण आत्ता सदरील वेबसाईट बंद असल्यामुळे या वर काही करता येउ शकत नाही.तरी पंचायत समितीला दोन दिवसात गावातील जेष्ट नागरीक ग्रा.प सदस्य व अंदोलन कर्ते पंचायत समितीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेउन या वर तोडगा काढु असे फोन द्वारे अश्वासन दिल्यामुळे सदरील अंदोलनाला स्थगीती दिली आहे. चर्चे अंती मार्ग न नि...
Image
  सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येतात त्यांना मोठे होण्यासाठी काही वेळ लागत नाही. प्रख्यात व्याख्याते देविदास फुलारी यांचे प्रतिपादन                                           माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे स्वर्ग वासी गंगाराम रुद्रवाड यांच्या स्पुर्ती दिनाच्या निमित्ताने गोदामाई बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात व्याख्यानाच्या माध्यमातुन व्याख्यान करताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रख्यात व्यख्याते देविदास फुलारी म्हणले की सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येणाऱ्या लोकांना मोठे होण्यासाठी कांही वेळ लागत नाही असे प्रतिपादन बरबडा येथे कपलेश्वर मंदिराच्या पटागंणात आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात फुलारी यांनी केले आहे       तालुक्यातील बरबडा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. पी. जी. रुद्रवाड यांनी भव्य असा सोहळा घडवून आणला सोर्गवास...
Image
  कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृती निमित्त बरबड्यात मित्र अमृत गौरव सोहळा ;  साहित्यिक व्याख्याते देविदास फुलारी यांच्यासह डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न                माधव पवार   नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै.गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीदिनाच्या निमित्ताने दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी मानवी जीवन अमूल्ये असल्यामुळे भगवंताचे चिंतन प्रेम व परोपकार हे ध्येय मनी धरून माणुसकीचा अंगीकार करीत सामाजिक व धार्मिक शैक्षणिक कार्याची जबाबदारी सांभाळत कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्राध्यापक पी जी रुद्रवाड यांनी मित्र अमृत गौरव सोहळ्याचे आयोजन करून साहित्यिक व्याखान करते देवीदास फुलारी यांच्यासह मित्र अमृत सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ष ब्र १०८ डॉ.विरुपाक्ष यांच्या ज्ञान अमृतातुन सदरचा सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे         तालुक्यातील मौजे बरबडा येथे भव्य असे देवस्थान असलेले कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीस प्रथम ...
Image
  नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षा सारखी अवस्था ;  राष्ट्रवादी काँग्रेसची होणार का ? भास्करराव भिलवंडे यांनी केली चिंता व्यक्त.  नायगाव  / रुई माधव पवार नायगाव विधानसभा मतदार संघातील दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या दोन तीन वर्षाखाली मोठया प्रमाणात गळती लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची घडयाळ बाजूला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला होता व कमळ हातात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भाजपाचे कमळ कोमेजून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची घड्याळ मजबूत हाताला बांधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आनंद उत्सव सा...
Image
  नागोराव तिप्पलवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्काराने सन्मानित     नायगाव रूई - माधवराव पवार  पुणे शहरात दि २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यात तिप्पलवाड नागोराव मारोती उर्फ एन टी सर बरबडेकर यांना राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे ह-भ-प मा  श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी तसेच समारंभाचे अध्यक्ष मा. रमेश आव्हाड ,माजी पोलीस अधिकारी मुंबई,सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार  संस्थापक मानवधन शैक्षणिक संस्था नाशिक समारंभ मार्गदर्शक मा सौ मीनाक्षी गवळी जगदाळे समाजसेविका नाशिक, मा. प्रकाश सावंत संयोजक,पुरस्कार मानकरी महामंच महापरिषद समन्वयक इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याना स्मृतिचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र मानकरी बॅच व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे भूषण असलेले,सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील आदर्श शिक्षक तिप्पलवा...

घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न

Image
घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिवननोन्नती अभियान संपन्न नायगाव - रुई   माधव पवार  -------------------------------------------------------------------- नायागांव तालुक्यातील मौजे घुंगराळ्याच्या ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १४ ते २३ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकाळात गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रा राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व आमसभा संपन्न झाली असून या महत्वपूर्ण कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरच्या अभियानाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावच्या सरपंच राधाबाई जोगेवार, ज्ञानदेवी दामोदर सोलमकर यांनी कौतुक केले आहे  तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात स्वयंसहाय्यता समूह जोडून जवळ पास एकूण आकारा बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या सी आर टी. म्हणून सौ मायावती सिद्धार्थ ढवळे यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यक्रमाला एकदरीत गावातील २०...

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

Image
 रुई वार्ताहर माधव पवार  नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित केलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सरपंच व उपसरपंच यांची अतिशय महत्वाची उपस्थिती मानली जाते परंतु प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला प्रशासना कडून सरपंचाला सूचनाच मिळाली ? नसल्याने घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवर ह्या सदरच्या कार्यक्रमा पासून वंचित राहिल्यामुळे सरपंच बाईने नाराजी व्यक्त केली असल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे ताक्यातील मौजे घुंगराळा येथे जिल्हा परिषद हायस्कूल तेथे विविध क्षेत्राच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती परंतु घुंगराळ्याच्या महिला सरपंच श्रीमती जोगेवार यांना सदरच्या प्रशासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात करण्यात आल्यावर ही बोलावले नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महोन जोगेवार यांनी सांगितले असले तरी मंडळधिकारी कळकेकर यांनी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी फोन करून सांगितले  असल्याचा आरोप सरपंच प्र...

बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटुर पोलीसाच्या धाडीत विस हजाराची देशी दारू जप्त अन.. दारूबंदी अधिकाऱ्यांना लागली मालिद्याची आस..आणि गोरगरिबांच्या संसाराची लागली वाट

Image
  नायगाव / रुई  माधव पवार  नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे पाटोदा (त ब ) शिवारातील टाळक्याच्या पिकात बरबडा येथील रहिवासी असलेले एक इसमानी देशी दारूचे सात बॉक्स लपवून ठेवून चोरट्या मार्गाने विक्री करण्याचा अशे पोटी लपून ठेवले होते परंतु सहाय्यक पोलिस अधिक्षक बिलोलीचे अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून फौजदार दिनेश येवलेसह फौजदार संजय अटकोरे यांच्या टीमने बरबड्याच्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन सात अवैध देशी दारूचे बॉक्स जप्त केले असताना सुद्धा बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याचा मालिद्यात जिव गुंतला असल्यामुळे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गासह जनतेतुन संताप व्यक्त केला जात असला तरी गोरगरीबाच्या संसाराची चांगली वाट लागली आहे  तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात हद्दीत असलेल्या बरबडा गावात गेल्या एक ते दोन महिन्या खाली बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या टीमने अवैध देशी दारूचे २७ बॉक्स ...

माजी मंत्र्याचे जावाई आंबादासराव धर्माधिकाऱ्याची आघामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी बरबडा गटात हालचाली सुरु

Image
 नायगाव / रुई - माधव  पवार  राजकीय वर्तुळात राजकीय वादळ उठवणारे माजी मंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे बरबडा येथील रहिवासी असलेले जावाई अंबादासराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरबडा जिल्हा परिषद गटात मोर्चे बांधण्यासाठी हालचाली चालू केले असल्याचे पाहावयास मिळत असून बरबडा जि.प गटात सोयऱ्या धायऱ्याचे राजकारण होणार की काय याकडे निवडणुकी पूर्वीच अनेकांचे लक्ष लागले आहे नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील रहिवासी असलेले माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर हे सध्या भाजपा पक्षात असल्यामुळे बरबड्याचे अंबादासराव धर्माधिकारी हे राजेश कुंटूरकर यांचे मेहुणे असल्यामुळे भाजपा पक्षा कडूनच मोर्चे बांधणीच्या हालचाली चालू केल्या आहेत की असा प्रश्न जनतेला पडला असला तरी राज्यातल्या राजकारणापेक्षा जिल्ह्याचे राजकारण वेगळे तर जिल्ह्याच्य राजकारणापेक्षा ग्रामीण भागातील राजकारण हे टोकाला जाऊन केल्या जाते हे मात्र वास्तव चित्र अनेकवेळा स्पष्ट दिसून येते राजकारण...

केंद्रीय अर्थराज्य मंञी भागवत कराड साहेबांचे बोळेगाव येथे जंगी स्वागत

Image
बिलोली/नागेश इबितवार भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थराज्य मंञी हे देगलूर/ बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आनुषंगाने सगरोळी दौऱ्यावर आले असता बोळेगाव येथे ग्रा.पं.सदस्य विठ्ठल तुकडेकर यांनी जंगी स्वागत केले यावेळी भाजपा संघटन मंञी संजय भाऊ कौडगे,जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब  ज्ञानेश्वर करडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

इंडियन पँथर सेनेच्या पाठपुराव्याला यश!

  नांदेड प्रतिनिधी- घाटे वैभव        नांदेड जिल्ह्यातील बिलोली हा सर्वात जुना व मोठा तालुका असून स्वातंत्र्याच्या ७४ वर्षात अग्निशमन बंब खरेदी करता आले नव्हते परिणामी बिलोली व परिसरात अनेक आगीच्या घटना घडल्या अनेकांची घरे,दुकाने इतकेच नाही तर अग्निशमन बंब च्या अभावी आगीमुळे शेतकऱ्यांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.या सामाजीक प्रश्नांची जाण असणाऱ्या इंडियन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांनी ४-५ वर्षांपासून सतत शासनदरबारी पाठपुरावा करून बिलोली नगर परिषदेच्या गाळा लिलावातून मिळालेल्या रकमेतून किंवा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)यातून बिलोलीसाठी कायमस्वरूपी अग्निशमन बंब ची मागणी करून वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ही मार्ग अवलंबविला होता.याचीच फलनिष्पत्ती म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)२०२१ अंतर्गत बिलोली नगर परिषदेसाठी नवीन अग्निशमन बंब खरेदी करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.              या पूर्वी बिलोली व परिसरात ...

सामाजिकदृष्ट्या वंचित असलेला धोबी समाज! राजकीय दृष्ट्याही अजून वंचितच का!--डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र-

Image
बिलोली/नागेश इबितवार सर्व डेबूजी युथ ब्रिगेडच्या शिलेदारांना आव्हान करण्यात येते की! कोणत्याही पक्षाच्या मागे जाऊ नये. समाजाचा फक्त वापर करत आहेत. राज्यकर्त्यांनी परिट धोबी समाजाला गृहीत धरू नये.राज्यकर्त्यांनो आमचा विचार करा.अन्यथा आम्हाला तुमचा विचार करावा लागेल. आमचा विरोध आम्ही मत पत्रिकेतून दाखवून देऊ आपल्या बिलोली देगलूर मतदारसंघात विविध धार्मिक सामाजिक नेत्यांचे अनेक पुतळे आणि माहामानवांच्या नावाने मार्ग आहेत पण ज्या महाराष्ट्राला आपल्या कीर्तनातून आणि कृतीतून जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे व अहोरात्र समाजासाठी झटले , स्वताच्या संसराचा सुद्धा त्याग केला.आशा संतांचा सन्मान करुन गौरव केला पाहिजे.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा नांदेड शहरात व जिल्ह्यात अजूनही एकही पुतळा नाही मग राष्ट्रसंत गाडगे बाबा फक्त तुम्हाला निवडणुकीपुरतेच आठवतात का! परीट/धोबी समाजाचा युवक आता जागृत झालेला आहे त्यांना स्वतःच्या विचारांची जाण आहे.तो समाज सुद्धा राजकिय द्रष्ट्या सक्षमआहे. जो आमचा विचार करणार नाही! त्याचा आम्ही पण विचार करणार नाही!आता आमचा निर्धार पक्का जो करेल धोबी समाजाचा विचार त्यालाच मारू शिक्का.?द...