बिलोली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- वैभव घाटे यांची मागणी
बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार
बिलोली तालुक्यात काही दिवसात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सोयाबिन उडीद मुग कापुस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र पाऊस आसल्यामुळे नदी नाले तुंटुब भरुन वाहात आहेत अनेकांच्या शेतातील उभे पिके पाण्याखाली गेलेले आहेत सतत पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून अन्य भाजीपाला पिकेही अडचणीत आली आहेत. शेतातील कापुस सोयाबिन पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत सध्या कापुस सोयाबिन नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अशावेळी पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी झाली आहे . पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन हेक्टरी पन्नस हाजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी वैभव घाटे यांनी मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांच्या कडे मेलद्वारे पञ पाठवुन मागणी केली आहे

Comments
Post a Comment