नगरसेवक जावेद कुरेशी पाणीटंचाईच्या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले निवेदन बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)
बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे) शहरातील भास्करनगर, नई आबादी प्रभाग क्र. एक मध्ये अनेक दिवासापासुन पाणी टंचाई असल्याने या भागाचे नगरसेवक जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढणार असल्याची माहीती आहे. भास्करनगर व नई आबादी मध्ये नळ योजना कार्यान्वीत नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी यापुर्वी अनेकवेळा निवेदन मोर्चा काढण्यात आले होते. सतत रेटा लावल्या नंतर बिलोली नगरपालीकेने या भागात बोआरवेल खोदुन मोटार व पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याचा ठराव सम्मत करण्यात आला. भुजल विभागाचे आधिकारी स्थळ पहाणी करुन पाणी आसलेली जागा दाखवुन मंजुरी दिली, अन्दाज पत्रक तयार असुन मंजुर आहे.यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही. कोठे शिकली समजले नाही. बिलोली नगर पालीका जनतेला प्राथमिक सुविधा पाणी पुरवठा स्वच्छता वा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी आहे. याकडे बिलोली नगरपालीका जाणीवपुर्वक ...