Posts

नगरसेवक जावेद कुरेशी पाणीटंचाईच्या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले निवेदन बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)

Image
बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)  शहरातील भास्करनगर, नई आबादी प्रभाग  क्र. एक मध्ये अनेक दिवासापासुन पाणी टंचाई असल्याने   या भागाचे नगरसेवक  जावेद  कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली  भव्य मोर्चा काढणार असल्याची माहीती आहे. भास्करनगर व नई आबादी मध्ये नळ योजना कार्यान्वीत नसल्याने  तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी  यापुर्वी अनेकवेळा निवेदन मोर्चा  काढण्यात आले होते. सतत रेटा लावल्या नंतर   बिलोली नगरपालीकेने  या भागात बोआरवेल खोदुन मोटार व पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याचा  ठराव सम्मत करण्यात आला.  भुजल विभागाचे आधिकारी स्थळ पहाणी करुन  पाणी  आसलेली जागा  दाखवुन मंजुरी दिली, अन्दाज  पत्रक तयार असुन मंजुर आहे.यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही. कोठे शिकली समजले नाही. बिलोली नगर पालीका  जनतेला प्राथमिक सुविधा  पाणी पुरवठा  स्वच्छता  वा  आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी आहे. याकडे बिलोली नगरपालीका  जाणीवपुर्वक ...

बिलोलीच्या माजी नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड यांच निधन

Image
बिलोलीच्या माजी नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड यांच निधन नांदेड प्रतिनिधी  बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भीमराव गायकवाड यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मुदखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते .त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री होत.

रायगङ काँलनितील आरक्षित असलेल्या जागेवर सूरू असलेल्या बांधकामाचा महापालिकेने खूलासा करावा ? नरेंद्र मोदी विचार मंचचे अध्यक्ष सूनिल सामंत यांची मागणी कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर  महापालिकेच्या  हद्दीतील  रायगङ  काँलनीकङे  जाणाया  मूख्य  रस्त्याला  लागूनच  सार्वजनिक  उद्यान  आणी  सार्वजनिक  दवाखाण्यासाठी  आरक्षीत  असलेल्या  जागेवर  बेकायदेशीररित्या  बांधकाम  सूरू  आहे.  त्या  बांधकामास  कोणत्या  धर्तीवर  मंजूरी  देण्यात  आली  त्याचा  महापालिकेने  खूलासा  करावा  अशी  मागणी  नरेंद्र  मोदी  विचारमंचचे  अध्यक्ष  सूनिल  सामंत  यांनी  निवेदनाद्वारे  केली  आहे    निवेदनातील  आशय  असा''' कोल्हापूर   महापालिका  हद्दीतील  पाचगाव  रोङ  ''  रायगङ  काँलनीकङे  जाणाया  मूख्य  रस्त्याला  लागूनच  री.  स.  नंबर  779  बी  वार्ङ  आरक्षण  क्रमांक 250  व  251  नूसार  ही  जागा  नागरिकांच्या  सोयीसाठी ...

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी हाणमंत कंठे यांची बिनविरोध्द निवड

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दिंनाक 11 सप्टेंबर 2019 रोजी जि.प.प्रा.शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षची निवड सर्वनुमते करण्यात आली आहे नुतन कार्यकारणी समिती अशी अध्यक्ष हाणमंत कंठे उपाध्यक्ष खुशाल गायकवाड सदस्य नागेश घाटे करिम शेख लता बावलगावे श्रीदेवी बावलगावे विलासबाई विरळे संघाबाई पाटील अनिता शेवाळे शंकर डुबुकवाड इत्यादी कार्यक्रमासाठी सौ.सरपंच  साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे रामराव पाटील मारोती पाटील माणिकराव बासरे माधवराव घाटे बाबाराव तोटलवार आपसर पठाण अरिप पठाण बसवंत पाटील अशोक धोञे भास्कर घाटे इत्यादी पालक सभेस उपस्थित होते पालक सभेच सुञसंचालन सहशिक्षक मेञे सरांनी केले शाळेचे मुख्याध्यापक मिरजापुरे सरानी प्रस्ताविक मांडले व शासनाचे नियमवाली पालकाना समजावुन सांगितले पालक सभेच्या शेवटी मेञे सरानी सर्वाचे आभार माणले

बिलोलीत लाच घेताना उपविभागीय अधिकारी लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रेती ट्रक सोडविण्यासाठी मागितली होती दोन लाख रक्कमेची लाच महसुल विभागात उडाला खळबळ जिल्हा प्रतिनिधी नांदेड :- (वैभव घाटे)

Image
जिल्हा प्रतिनिधी  नांदेड :- (वैभव घाटे) महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी आमोलसिंह भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आसुन रेतीची अवैध वाहातुक करणाऱ्या दोन ट्रकना सोडुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती लाचलुचपत विभागाने सापळा रचुन ही कार्यवाही केली बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे भोसले यांच्या विरुध्दांत ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे हायवा ट्रक बिलोलीच्या उपविभागिय कार्यालयात अवैध रेती वाहतुक करताना काही महीण्यापुर्वी जप्त केली होती श्यामकुमार गोणणे रा. निजामाबाद आणि श्रीनिवास जिनकल मिरयालगुडा अशी मध्यस्थाची नावे आहेत या लाचलुचपत पथकाचे उपविभागिय पोलीस अधिकारी विजय डोगरे ला.प्र.वि. नांदेड प्रशांत रुमने ला.प्र.वि.नांदेड पोलीस निरिक्षक बि.एच.काकडे ला.प्र.वि.नांदेड हाणमंत वाडेकर किशन चितोरे सचिन गायकवाड अमरजीत सिंह अंकुश गाडेकर सुरेश पांचाळ मारोती सोनटक्के अनिल कदम आदीने सापळा रचुन यशस्वी कार्यवाही केली

महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)

Image
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला  अलमट्टी धरणच जबाबदार आहे. पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर  महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला... आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुर...

बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,  या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.       यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे  यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान  कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व...