Posts

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी हाणमंत कंठे यांची बिनविरोध्द निवड

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दिंनाक 11 सप्टेंबर 2019 रोजी जि.प.प्रा.शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षची निवड सर्वनुमते करण्यात आली आहे नुतन कार्यकारणी समिती अशी अध्यक्ष हाणमंत कंठे उपाध्यक्ष खुशाल गायकवाड सदस्य नागेश घाटे करिम शेख लता बावलगावे श्रीदेवी बावलगावे विलासबाई विरळे संघाबाई पाटील अनिता शेवाळे शंकर डुबुकवाड इत्यादी कार्यक्रमासाठी सौ.सरपंच  साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे रामराव पाटील मारोती पाटील माणिकराव बासरे माधवराव घाटे बाबाराव तोटलवार आपसर पठाण अरिप पठाण बसवंत पाटील अशोक धोञे भास्कर घाटे इत्यादी पालक सभेस उपस्थित होते पालक सभेच सुञसंचालन सहशिक्षक मेञे सरांनी केले शाळेचे मुख्याध्यापक मिरजापुरे सरानी प्रस्ताविक मांडले व शासनाचे नियमवाली पालकाना समजावुन सांगितले पालक सभेच्या शेवटी मेञे सरानी सर्वाचे आभार माणले

बिलोलीत लाच घेताना उपविभागीय अधिकारी लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रेती ट्रक सोडविण्यासाठी मागितली होती दोन लाख रक्कमेची लाच महसुल विभागात उडाला खळबळ जिल्हा प्रतिनिधी नांदेड :- (वैभव घाटे)

Image
जिल्हा प्रतिनिधी  नांदेड :- (वैभव घाटे) महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी आमोलसिंह भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आसुन रेतीची अवैध वाहातुक करणाऱ्या दोन ट्रकना सोडुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती लाचलुचपत विभागाने सापळा रचुन ही कार्यवाही केली बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे भोसले यांच्या विरुध्दांत ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे हायवा ट्रक बिलोलीच्या उपविभागिय कार्यालयात अवैध रेती वाहतुक करताना काही महीण्यापुर्वी जप्त केली होती श्यामकुमार गोणणे रा. निजामाबाद आणि श्रीनिवास जिनकल मिरयालगुडा अशी मध्यस्थाची नावे आहेत या लाचलुचपत पथकाचे उपविभागिय पोलीस अधिकारी विजय डोगरे ला.प्र.वि. नांदेड प्रशांत रुमने ला.प्र.वि.नांदेड पोलीस निरिक्षक बि.एच.काकडे ला.प्र.वि.नांदेड हाणमंत वाडेकर किशन चितोरे सचिन गायकवाड अमरजीत सिंह अंकुश गाडेकर सुरेश पांचाळ मारोती सोनटक्के अनिल कदम आदीने सापळा रचुन यशस्वी कार्यवाही केली

महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)

Image
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला  अलमट्टी धरणच जबाबदार आहे. पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर  महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला... आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुर...

बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,  या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.       यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे  यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान  कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व...

संगणक परीचालकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न

Image
बिलोली प्रतिनिधी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बिलोली च्या वतीने दि 28 ऑगस्ट रोजी आपल्या विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.     शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. संगणक परिचालक हे सर्व कामे तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत  हे मानधन पण वेळेवर होत नाही.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने खालील मागण्या घेऊन आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी,  पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आय टी महामंडळाकडू नियुक्ती द्यावी, संगणक परीचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातु न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना किमान 15000 हजार वेतन द्यावे इत्यादी प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ...

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यात  पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री करत अक्षरश: कहर केला आहे.  धुवाँधार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने गंजगाव माचनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  संततधार पावसामुळे कार्ला ते गंजगाव रस्तामध्ये   नाल्यावर  रात्रीपासून पाण्याखाली गेला. त्यामुळे गावांचा बिलोली तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जावून दोन तिन दिवस  पाण्याखाली राहतो.गावचे सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यांनी  या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली असली तरी याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे .

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

Image
नांदेड जिल्हा प्रतिनिधी  (वैभव घाटे ) बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दोन वर्षांपासून परिसरातील ग्रामीण  भागात झालेला आसुन कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आसुन   ग्रामिण भागातील नागरिकांच्या  जीवाशी खेळ खेळत आहेत कोणती पदवी ना कुठली शाश्वती नसतानाही   दोन वर्षांपासून परिसरातील गंजगाव माचनुर कार्ला बडुर नागणी इत्यादी  भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी स्थानिक  भोळ्याभाबड्या  गरिब बांधवाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून गावातील व्यक्तीची  फसवणूक करुन पुरुष गब्बर बनले आहेत. सद्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून काही अती तापमान तर कधी केवळ पावसाचे वातावरण अशा परिस्थितीत हवामानात झालेल्या बदलाने अतिसार, मलेरिया,  यासारखे आजार दिसू लागले आहेत .ग्रामीण नांगरिकांना बिलोली कुंडलवाडी बोधन  हे अंतर लांब असल्याने आणि आर्थिक पर...